
संविधान न्याय जनजागृती यात्रा…
वणी-भारत जोडो अभियानांतर्गत संविधान न्याय जनजागृती यात्रा दिनांक 28ऑक्टोबर 2025ते4नोव्हेबर 2025पर्यत यवतमाळ येथुन बाभुळगाव -कळंब-राळेगाव-मारेगाव-वणी-झरी-केळापुर-घाटंजी-आर्णी-महागाव-उमरखेड-पोफाळी-पुसद-दिग्रस-दारव्हा-नेर-मार्गकमन करत यवतमाळ येथे समारोप केला जाणार आहे या संविधान न्याय याञे अंतर्गत भारत जोडतो अभियान, महाराष्ट्र जन सुविधा सुरक्षा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा ओबीसी सह सर्व प्रवर्गातील जातीची जातीनिहाय जनगणना त्वरित पूर्ण करावी आरक्षणाची50%मर्यादा काढून टाकावी.लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ करण्यात यावी.शेतकर्याची कर्ज माफीची घोषणा त्वरित करण्यात यावी.हमीभाव योग्य दर, यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा.संविधानातील लोकशाही मुल्य न्यायाधीकार अबाधित ठेवण्यात यावे.नविन शिक्षण धोरण रद्द करुन मोफत शिक्षण अन्न वस्त्र निवारा आरोग्य प्रणाली विकसित मिळीवी महिला सुरक्षा सह इतरही मागण्यांना घेऊन ही जनजागृती करत हा मार्च वणी -कायर या गावी पोहोचली असता येथे याञेचे भव्य स्वागत करण्यात आले याप्रसंगी संविधान जागृती अभियानाला उत्तम खंदारे मुख्य निमंत्रक व जिल्हा समन्वयक गोविंद चव्हाण, सविताताई हजारे,प्रा.दीपक वाघ, विठ्ठलराव नागमोते ,श्री नंदकिशोर अंबोरे तालुका उपाध्यक्ष,सौ कविता नंदकिशोर अंबोरे,श्री गोपालसिंह भदोरीया, श्री प्रभाकर मंथनवार, श्री, सचिन पिदुरकर, श्री संतोष घोंगे, निलेश मंथनवार आकाश महाडोळे व कायर ग्रामवासी ह्या सर्वानी जनमानसाला देशाची एकता अखंडता हे अबाधित ठेवण्यासाठी भारत जोडो ही संकल्पना घेऊन हा मार्च समोर आपल्या पुढे आला आहे असे संबोधित केले.



